विशेष मुलाखत

आगामी काळात देशाच्या विविध राज्यांत सहकार भारतीच्या कार्याचा विस्तार करण्या बरोबर नजीकच्या काळात नव्याने उभ्या राहणार्या सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर असणार आहे असे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी विशेष मुलाखतीमध्ये सांगितले. डॉ. जोशी यांची नुकतीच सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी विषेश मुलाखतीमध्ये सहकार भारती आणि एकूणच सहकार क्षेत्राविषयी मते मुलाखतीच्या माध्यमातून मांडली आणि आगामी काळातील योजनांचे सुतोवाच केले. सहकार भारतीच्या विस्तार कार्याबाबत ते म्हणाले, आजमितीस देशातील 28 राज्य आणि 650 जिल्ह्यांत विस्तार झाला आहे आणि सहकार भारतीच्या स्थापनेला 47 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त यापुढील काळात भौगोलिक विस्तारावर अधिक प्रमाणात भर देण्यात येणार आहे. याबरोबर संस्थात्मक स्तरावरदेखील विस्तार करण्याचे उद्दिष्ट नक्की करण्यात आले आहे. आजमितीला देशात 55 विविध प्रकारच्या सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात सहकारी संस्था उभारणी आणि कार्यकर्ता संमेलन याचे आयोजन करण्यात येत आहे. असे असले तरी प्रत्येक जिल्ह्यांत सहकार भारतीचे काम सुरू झाले पाहिजे यावर भर असणार आहे.
सहकार भारतीची प्रशिक्षणाची सुविधा -
सहकार क्षेत्राच्या स्तारीकरणावर विशेष भर -
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राविषयीचे भाष्य करतांना ते म्हणाले, सुरूवातीपासून महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रात आघाडीवर राहिले आहे आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या नेत्यामुळे सहकार चळवळीला बळ मिळाले आहे. बदलत्या गरजा आणि काळानुसार विविध क्षेत्रात सहकार क्षेत्र अधिक प्रमाणात विकसित होत आहे. मुंबईतील वेगवान विश्वामुळे सहकार क्षेत्र रुजण्यासाठी मर्यादा असल्या तरी कोकण विदर्भ, मराठवाड्यात सहकाराचे तत्त्व पोहोचविण्यासाठी सहकार भारतीचे कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत.
गुजरातमधील अमूलचा विचार करायचा झाला तर या ब्रँडशी असंख्य शेतकरी जोडले आहेत. अमूलची दुध संकलन क्षमता देखील खूप मोठी आहे म्हणजेच ती आठ कोटी इतकी आहे. महाराष्ट्रचा विचार करता अनेकविध दुधाचे ब्रँड प्रचलित आहेत. मात्र अजूनही ते अमूलची उंची गाठू शकले नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे या क्षेत्रात राज्याला आणखी काम करण्याची संधी आहे.
सहकारी साखर कारखान्यांबाबत सहकार भारतीचा प्रस्ताव -
सहकारी साखर उद्योगाबाबत विचारता ते म्हणाले, सहकारी साखर उद्योग हा देशातील एक महत्वाचा असा उद्योग आहे. ग्रामीण भागाचा विकास आणि उभ्या राहिलेल्या पायाभूत सुविधा यामागे सहकारी साखर कारखाने आहेत हे लक्षात घ्यायला हवे. मात्र या क्षेत्रात देखील राजकीय भूमिकेने प्रवेश केला आहे आणि एक अनिष्ट प्रथा सुरू झाली आहे. चांगल्या स्थितीत असणार्या सहकारी साखर कारखान्याचा ताळेबंद खराब करायचा आणि मग तो डबघाईला आला की मग खासगी क्षेत्राला विकायचा. मग तो चांगला चालायला लागतो. यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत. याबाबत सहकार भारतीने सरकारला एक प्रस्ताव पाठविला आहे. असा एखादा साखर कारखाना बंद पडला की, तो एखाद्या सहकारी संस्थेला विकण्यात यावा. जेणेकरून त्याची मालकी सहकार क्षेत्राकडे राहील. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कच्ची साखर विकणे, इथेनोल उत्पादन, सहविजनिर्मिती यासारखे प्रयोग सहकार भारतीच्या माध्यमातून सुरू झाले आणि यशस्वी होत आहेत, असे ते म्हणाले.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास प्रश्न महत्त्वाचा -
नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही भूमिका -
Related Post
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने.....
- नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळ मुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन
- देशभरात सहकार भारतीच्या विस्ताराबरोबरच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करणार : सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी
- केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
- सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांचे निधन
- सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान - सतीश मराठे
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह
Related Posts
सहकारी दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी तीन नवीन बहु-राज्य सहकारी समित्या होणार
सहकारी दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी तीन नवीन बहु-राज्य सहकारी समित्या होणार केंद्रीय…
सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान – सतीश मराठे
सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान -…
त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या निमित्ताने…
त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या निमित्ताने... सहकारी संस्थांसाठी पात्र मनुष्यबळ निर्माण करण्याच्या…